Monday, 19 November 2012

श्यामलाल यांचा जीवन प्रवास....




      श्यामलाल हे जेष्ठ पत्रकार व टाइम्स ऑफ इंडिया या नामांकित वृत्तपत्राचे संपादक होते.   इतिहास, समाजकारण व तत्वज्ञान हे श्यामलाल यांचे आवडते विषय होते. इंग्रजी साहित्यात पदवीचे शिक्षण घेत असतानांच त्यांना १९३४ मध्ये पत्रकार होण्याची संधी मिळाली. हिन्दुस्थान टाइम्स या प्रख्यात इंग्रजी दैनिकात त्यांना विनामोबदला प्रशिक्षणार्थि पत्रकार म्हणून सेवेत घेण्यात आले. देवदास गांधी हे त्यांचे त्यावेळचे सहकारी होते.
      सन १९३७ मध्ये हिन्दुस्थान टाइम्स चे पहिले व्यावसायिक संपादक पोर्थेन जोसेफ यांच्या हाताखाली काम करण्याची संधी श्यामलाल यांना मिळाली. जोसेफ हे  मध्येच कराचीला गेले, (तेथे त्यांनी डॉन इंग्रजी वृत्तपत्र सुरु केले. जे आज पाकिस्थानचे आग्रगण्य दैनिक बनले आहे.) श्यामलाल हे १९३४ ते १९४६ असे एकूण १२ वर्षे ते हिन्दुस्थान टाइम्स च्या सेवेत होते. या काळात त्यांनी उपसंपादक म्हणून दोन पाळ्यांत काम केले. प्रमुख लेखांचे लेखण व देवदास गांधी यांच्या स्तंभलेखाचे संपादन केले. अनेक तास ते या वृत्तपत्रात काम करायचे, मात्र त्यांच्या ६० वर्षाच्या प्रदिर्घ वृत्तपत्रकारितेमधील सर्वात अविस्मरणिय कालखंड म्हणजे वरील १२ वर्षाची सेवा, असे ते मानत होते. कारण याच काळात साहित्याचे विद्यार्थि असलेले श्यामलाल यांचा राजकीय, तत्वज्ञानाशी सखोल अभ्यास झाला होता. आताच्या प्रमाणे राज्यशास्त्र हा विषय ब्रिटिश काळात भारतीय विद्यापिठातून शिकवला जात नसे. श्यामलाल यांच्यावर कांट, स्पिनोझा, हेगेल, बेंथम, मिल, रिकार्रो, वेबर आणि मार्क्स यांच्या विचार सारणीचा प्रभाव श्यामलाल यांना नवनव्या कल्पनांची आवड होती. त्याच बरोबर त्यांना वाचनाची खुप आवड होती. त्यांच्याकडे जवळ जवळ २० हजाराहुण अधिक पुस्तकांचा संग्रह केला होता.
हिन्दुस्थान टाइम्स मधील १२ वर्षाची सेवेनंतर ती नोकरी सोडून १९५० मध्ये श्यामलाल  टाइम्स ऑफ इंडीयाच्या सेवेत रुजू  झाले. तेथे ते संपादक पदा पर्यंत पोहचले, त्यांची ही कारकिर्दी खुप गाजली. संपादकीय पानावर प्रसिध्द होणारे लेख ते स्वत काळजी पुर्वक वाचून निवड करीत असत. गुणवत्ता हाच एकमेव निकष ते लेखाबाबत ठेवत असत. त्यामुळे गुणवत्ता नसेल तर केवळ अभिनेते, राजकीयनेते, अन्य प्रसिध्द व्यक्ती किंवा पंतप्रधान देखील असले तरी त्यांचे लेख नाकारण्याबाबत  ते ठाम असायचे. श्यामलाल आपल्या तत्वापासून अजिबात ढळले नाहीत. छोट्या छोट्या वाक्यात आणि साध्या सोप्या शब्दांत अग्रलेख लिहीण्यवर त्यांचा भर असायचा. सहका-यांनी ते अलंकारीक व बोजड न लिहिता, सुटसुटीत व सुबोध लिहा असा आग्रह करित असत.
         श्यामलाल यांनी आपल्या कारकिर्दीत संपादक म्हणुन खुप लिखाण केले, पण त्याच बरोबर आंबेडकर, इंडियन रिअलिटीस्, क्रिटीक, आणि हंण्ड्रेड इनकांऊटर अशा वेगवेगळ्या विषयावर चार पुस्तके देखील लिहिली आहेत. संपादकीय बरोबर त्यांनी विविध सदरे देखिल लिहिलीत, द नॅशनल सीन, चित्रपट परिक्षण, लिटरेचर व्हियु, आणि लाईफ अण्ड लेटर्स हे सदर खुप गाजले.  त्यांनी आपल्या लिखाणातील शैली व वेगळेपण जपले. सामाजीक प्रश्न व समाज प्रबोधन करणारे लेखण श्यामलाल यांनी केले. साधे ,सरळ व सोपे लेखण करणारे लेखक अशीच श्यामलाल यांची ओळख होती.        

         आपल्या ९५ वर्षाच्या दिर्घायुष्यात सहा दशके ते पत्रकारितेत कार्यरत राहिले. उपसंपादक, प्रमुख लेखक, स्तंभ लेखक, आणि संपादक अशा जबाबदा-या सांभाळतानां श्यामलाल यांनी तत्वांशी काहीही तडजोड केली नाही, मुल्यांचे जतन केले. काही आदर्श मुल्य घालून दिली आणि पत्रकारितेचा दर्जा स्थापित केला.

No comments:

Post a Comment